Crop Insurance News : पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा, कारण न देता फेटाळले दावे

मराठवाड्यात पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. कारण न देता शेतकऱ्यांचे दावे फेटाळले आहेत.

मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढले होते. पण पिकविमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांचे दावे कुठलेही कारण न देता फेटाळले आहेत. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात १ लाख २३ हजार ६१९ पैकी ५२ हजार ५१९ शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण ७१ हजार १०० शेतकऱ्यांचे पिकविम्याचे दावे कुठलेही कारण न देता फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही ठिकाणी दोन भावांपैकी एकाच व्यक्तीला पिकविम्याचे पैसै देण्यात आले आहेत. दोघांच्या नुकसानीचे कारण असतानाही रक्कम देण्यात आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com