मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रुज आणि अन्य परिसरात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.
अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्ते जलमय झाले आहेत. के. पश्चिम वॉर्डमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने संताप व्यक्त केला आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी पालिकेला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, 'पालिका आयुक्तांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा साचलेल्या पावसाच्या पाण्यानेच आम्ही आयुक्तांचा जलअभिषेक करू.' स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.