पश्चिम विदर्भातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. हवामान विभागाने पश्चिम विदर्भातील ५ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ५ दिवसांमध्ये म्हणजेच २९ जूनपर्यंत या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानातील अचानक बदल लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, या कालावधीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.त्यामुळे शेतीकामांमध्ये दक्षता घेणं गरजेचं आहे. प्रशासनाने जनतेला उघड्यावर वावरताना खबरदारी घेण्याचे, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे तसेच विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.