माजी आमदार बच्चू कडू यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीतून त्यांनी हा राजीनामा देण्याचं पाऊल उचललं आहे. आपली सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिव्यांग व्यक्तींना अद्यापही अनेक गोष्टी मिळत नसल्याने याबद्दल खंत, नाराजी व्यक्त करत माजी आमदार बच्चू कडू यांनी आज आपला दिव्यांगकल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा शिंदेंना पाठवला आहे. तसंच सुरक्षा काढून घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. पदावर राहून आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांशी बेईमानी शक्य नाही, असं कडू यांनी राजीनाम्यात लिहिलं आहे. हा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.