अमर घटारे, अमरावती
राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यामुळं निवडणुकीपूर्वी महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन हवेत विरलं का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विरोधकांकडून सातत्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले जात आहे. याबाबत आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीला समोर गेलो; तेव्हा आम्ही संकल्प केला होता आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं सांगितलं होतं. त्या संकल्पामध्ये ज्या-ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या, त्या गोष्टी पाच वर्षांत आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, असे बावनकुळे म्हणाले.
आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्प पत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला, तो विकास आम्ही करू, असंही बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.
आमचा संकल्पनामा शंभर टक्के आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. संकल्पामध्ये जो आम्ही शब्द दिला आहे, ते आमचं महायुतीचे सरकार पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.