Raj Thackeray : फालतू माणूस; राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत काय? बिहारच्या मंत्र्याची जीभ घसरली

Raj Thackeray bihar bhavan : बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी “राज ठाकरे महाराष्ट्र के राजा हैं क्या?” असे विधान केले. या विधानामुळे राज ठाकरे व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. राज्यातील राजकारणात यामुळे चर्चा रंगली आहे.

Bihar Bhavan Row in Mumbai: मुंबईत होणाऱ्या बिहार भवनामुळे महाराष्ट्राचे आणि बिहारचे राजकीय वातावरण तापले आहे. मनसे आणि शिवसेनेने (ठाकरे) मुंबईतील बिहार भवनाला उघडपणे विरोध, केला. मुंबईत बिहार भवन बांधून देणार नसल्याची भूमिका ठाकरे बंधूंकडून घेण्यात आलाय. या विधानांनंतर महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत राजकीय वक्तृत्व तीव्र झाले आहे.

बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उडवली. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन बांधणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. राज ठाकरेंवर टीका करताना चौधरींची जीभ घसरली. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत, का? असा सवाल त्यांनी केला. हे फालतू लोक आहेत, कुणाचा बापही बिहार भवन बांधायला अडवू शकत नाही. बिहार भवनाचे बांधकाम थांबवण्याची ताकद कोणाकडेही नाही, असे अशोक चौधरी म्हणाले. त्यावर आता मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी माणसाला दुय्यम समजू नका असा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com