छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे संभाजी महाराजांचे शौर्य बघून कित्येक तरुण पिढी ही स्वतःला प्रेरणा देत असून राजकीय लोकांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी वादग्रस्त विधान केलं. आझमी यांनी माध्यमांशी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा आशयाची विधान समाजवादी पक्षा आमदार अबू आझमी यांनी केलं. तसेच औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो 24% होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जायचं या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का? असा सवाल अबू आझमी यांनी केला.
यावरच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Edited By Omkar Sonawane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.