VIDEO : मालवण दुर्घटनेनंतर Aaditya Thackeray भरपावसात सरकारवर बरसले!
मालवण : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागले आहे. मालवणमधील भाषणातून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु, अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली गेली. राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रया उमटल्या. दरम्यान महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये आंदोलन करण्यात आले. मालवणमधील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं. 'भाजपच्या कामाला गळती लागली आहे' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अयोध्येच्या राममंदिराच्या बांधकामावरून टीका केली आहे. देशातील कोणताही भाग भाजपने भ्रष्टाचार करण्यापासून सोडलेला नाही', असा आरोपही ठाकरे यांनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.