Dharashiv News: 50 वर्षांपूर्वी बांधलेला तलाव फुटला; क्षणातच होत्याचं नव्हतं झालं|VIDEO

Massive Loss for Farmers as Old Check: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारात 50 वर्षांपूर्वी बांधलेला पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

धाराशिव: यंदा मे महिन्याच्या पंधरवाड्यातच अवकाळी पाऊस आल्याने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लवकर मान्सून दाखल झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी असल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिति देखील निर्माण झाली आहे. अशातच धाराशिवमध्ये मोठी घटना घडली आहे.

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारातील तब्बल पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव पावसाने ओव्हर फ्लो होऊन फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेतजमीन व पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झाले आहे. तलावाचा भरावाचा मलबा शेतात गेल्याने उसाच्या उभ्या पिकात पाच ते सहा फुटांचा थर साचला आहे. त्याखाली पिक गाडलं गेलं असून शेतकऱ्यांची विहीर बुजली आहे, पाईपलाईन वाहून गेली. पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगडगोटे पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com