Educational News : दहावीच्या विद्यार्थ्यांना नो टेन्शन; उत्तीर्ण होण्यासाठी आता 35 ऐवजी 20 गुण लागणार

Big Breaking For 10th Students : नवीन अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचं टेंशन कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना कमी गुणांवर देखील अकरावीत प्रवेश घेता येणार आहे.

नवीन अभ्यासक्रम आराखड्यात विज्ञान आणि गणितावर तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे दहावीत गणित आणि विज्ञानात 20 गुण मिळाले तरी आता विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा देणं देखील बंधनकारक नसणार आहे. तर दहावीत गणित आणि विज्ञानात 20 गुण मिळाल्यास विशिष्ट शेऱ्यासह प्रमाणपत्र देण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्याना अकरावीत प्रवेश घेता येणार आहे.

नवीन अभ्यासक्रम आराखड्यात विज्ञान आणि गणितावर शिक्षण विभागाने आता तोडगा काढला आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुणांसह देखील आता अकरावीत प्रवेश घेता येणार आहे. यात दहावीच्या बोर्ड परीक्षेत विज्ञान आणि गणितात उत्तीर्ण होण्यासाठी आता 35 एवजी 20 गुण लागणार आहेत. त्यामुळे 20 गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील पुढील शिक्षण घेता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा देणे किंवा विशिष्ठ शेऱ्यासह प्रमाणपत्र स्वीकारणे असे दोन पर्याय विद्यार्थ्याना देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांचं टेंशन कमी झालेलं दिसत आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com