
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना भारतीय संघाने १८४ धावांनी गमावला.
या पराभवासह भारतीय संघ मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. दुसरीकडे पाकिस्तानला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ कुठला असेल, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान भारत, ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
भारतीय संघाला जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर सिडनी कसोटी सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. असं झाल्यास भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. तर ऑस्ट्रेलियाचे ३ सामने शिल्लक आहेत. फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३ पैकी केवळ १ सामना जिंकायचा आहे. या दोन्ही संघांसह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे.
भारत - ऑस्ट्रेलियासह श्रीलंकेलाही फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. श्रीलंकेला घरच्या मैदानावर खेळताना, दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेची फायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी झाली. पण फायनलमध्ये जाण्याचा मार्ग अजूनही पूर्णपणे बंद झालेला नाही. श्रीलंकेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिस सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामना ड्रॉ झाल्यास श्रीलंकेचा फायनलमध्ये जाण्याचा चान्स वाढणार आहे. कारण, ही मालिका झाल्यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे.
जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ड्रॉ राहिला आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तर श्रीलंकेचा संघ टॉप २ मध्ये प्रवेश करु शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.