Team India News: न्यूयॉर्कच्या मैदानावरून पेटला वाद? सामन्याआधी भारतीय खेळाडूंना राहुल द्रविडने दिली वॉर्निंग

Rahul Dravid On Team India: भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी राहुल द्रविडने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे.
Team India News: न्यूयॉर्कच्या मैदानावरून पेटला  वाद? सामन्याआधी भारतीय खेळाडूंना राहुल द्रविडने दिली वॉर्निंग
rahul dravid with rohit sharmagoogle

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहेत. याच मैदानावर भारत - बांगलादेश यांच्यातील सराव सामना पार पडला होता. दरम्यान पहिल्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी भारतीय खेळाडूंसोबत दीर्घकाळ चर्चा केली आहे.

नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे नव्याने उभारण्यात आलेलं स्टेडियम आहे. या मैदानावर राहुल द्रविड यांना खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची चिंता सतावतेय. भारतीय संघाचे आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकाविरुद्ध होणारे सामने हे याच मैदानावर होणार आहेत.

Team India News: न्यूयॉर्कच्या मैदानावरून पेटला  वाद? सामन्याआधी भारतीय खेळाडूंना राहुल द्रविडने दिली वॉर्निंग
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

काय म्हणाले राहुल द्रविड?

बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल द्रविड म्हणाले की, 'मैदानावरील जमीन भुसभुशीत आहे. त्यामुळे खेळाडूंना हॅम्स्ट्रिंगचा त्रास होऊ शकतो. आम्हाला यावर मेहनत घ्यावी लागेल आणि खेळाडूंनाही काळजी घ्यावी लागेल. आम्ही खरंच चांगली कामगिरी केली आहे.'

Team India News: न्यूयॉर्कच्या मैदानावरून पेटला  वाद? सामन्याआधी भारतीय खेळाडूंना राहुल द्रविडने दिली वॉर्निंग
Oman vs Namibia: १२ वर्षांनंतर T-20 WC मध्ये सुपर ओव्हरचा थरार! रोमांचक सामन्यात नामिबियाने मारली बाजी

भारताचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सराव सामना पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १२२ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६० धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com