
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.
पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांवर आटोपला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी २६५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ३ सामने खेळवले गेले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये कुठल्याही संघाला २५० धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी २६४ धावांचा डोंगर उभारला. या खेळपट्टीवर इतकं आव्हान खूप झालं. त्यामुळे भारतीय संघाला आक्रमक सुरुवातीची गरज होती. रोहित आणि गिलनेही अशीच काहीशी सुरुवात करुन दिली.
तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा स्ट्राईकवर होता. त्यावेळी तिसरे षटक टाकण्यासाठी ड्वारशुईस गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.
मात्र चेंडू हवा तितका लांब गेला नाही. हवेत उंच गेलेला चेंडू पकडण्यासाठी मार्नस लाबुशेन मागच्या दिशेने धावला. त्याने हवेत डाईव्ह मारली,पण चेंडू काही त्याच्या हाती आला नाही. मात्र झेल पकडण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले, त्याचं कौतुक होतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.