Rohit Sharma News : रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट, जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना दिली खुशखबर

Good News for Rohit Sharma : रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे.
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट, जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना दिली खुशखबर
rohit sharmatwitter
Published On

नवी दिल्ली : टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेट फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेने अनेकांना धक्का बसला. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर आता रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहितच्या चाहत्यांना मोठी खुशखबरी दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक व्हिडिओ शेअर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या व्हिडिओमाध्यमाद्वारे संवाद साधताना विश्वचषक जिंकण्याचं श्रेय राहुल द्रविड, रोहत शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाला समर्पित केलं आहे. तसेच यावेळी डब्ल्यूटीसी फायनल आणि चँमियन्स ट्राफीमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करेल, याला दुजोरा दिला आहे.

रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट, जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना दिली खुशखबर
Team India Fan Video : पठ्ठ्याने झाडावर बसून शूट केलेला व्हिडिओ व्हायरल; ओपन बसमधून कोहली-जडेजाने दिली भन्नाट रिअॅक्शन

एका वर्षात २ आयसीसी फायनलमध्ये पराभूत

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील एका वर्षात दोन आयसीसी फायनल हरलो होतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि दुसरा वनडे विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा टी२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत स्वत: रोहित शर्मा यांनी धमाकेदार फलंदाजी केली.

रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट, जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना दिली खुशखबर
Team India Viral Fan : टीम इंडियाला पाहण्यासाठी भन्नाट कल्पना सुचली कशी? झाडावर बसणाऱ्या कार्यकर्त्याने सर्वच सांगितलं

जय शहांनी केलं 'या' खेळाडूंचं कौतुक

टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. या अंतिम सामन्यात टीम इंडिया पराभूत होईल, असं वाटत असताना शेवटच्या ५ षटकात डाव फिरला. मात्र, दुसऱ्या डावाच्या शेवटच्या ५ षटकात डाव फिरला. शेवटच्या ५ षटकात जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह या सर्वांनी जबरदस्त गोलंदाजी करत सामना फिरवला.

तसेच या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेविड मिलचा झेल घेतला. त्याचवेळी अनेकांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावर भाष्य करत भारताच्या विजयात शेवटच्या षटकाचं मोठं योगदान असल्याचं जय शहा यांनी स्पष्ट केलं. यासाठी जय शहा यांनी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यांचं कौतुक करत आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com