Jammu & Kashmir Issue: 'तर तुम्ही POK परत का घेत नाही?', अमित शहांनी नेहरूंवर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

Jammu & Kashmir Issue: पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य दिलं. वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. अमित शहांना बहुधा देशाचा इतिहास माहिती नसावा. केवळ गोंधळ घालण्याच्या उद्देशाने सत्ताधारी आणि गृहमंत्री अशी विधाने करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.
Jammu & Kashmir Issue
Jammu & Kashmir Issue Saam Digital
Published On

Jammu & Kashmir Issue

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकांमुळे जम्मू काश्मीरला नुकसान सहन करावं लागलं. अकाली युद्धविराम आणि काश्मीरचा मुद्या संयुक्त राष्ट्रात नेण्यासारखे निर्णय घेतले, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत केला होता. या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाना साधला आहे. कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अमित शहा यांच्या इतके जवाहरलाल नेहरू हुशार नव्हते असा टोला लगावला होता. आता राहुल गांधी यांनीही यावर भाष्य केलं आहे.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य दिलं. वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. अमित शहांना बहुधा देशाचा इतिहास माहिती नसावा. केवळ गोंधळ घालण्याच्या उद्देशाने सत्ताधारी आणि गृहमंत्री अशी विधाने करत आहेत. मुळ मुद्दा जात जनगणना , भागिदारी आणि देशाची संपत्ती कोणाच्या हाती आहे, याचा आहे. मात्र सत्ताधारी या विषयांवर चर्चाच करू इच्छित नाहीत. कारण ते घाबरतात, चर्चा करण्यापासून दूर राहतात. मात्र आम्ही हा मुद्दा पुढे घेऊन जाणार असून गरीब जनतेला न्याय मिळवून देणार देणार असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

Jammu & Kashmir Issue
OBC Mahamelava: आता नांदेडमध्ये ओबीसी महामेळावा; छगन भुजबळांची तोफ धडाडणार, जरांगे-पाटील यांच्या सभांना देणार उत्तर

गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना जवाहरलाल नेहरुंवर आरोप केले होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकांमुळे जम्मू काश्मीरच्या जनतेला त्रास सहन करावा लागला. याबाबत राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना, नेहरूंनी देशासाठी संपूर्ण आयुष्य दिलं. अमित शहांना कदाचित इतिहास माहिती नसावा आणि त्यांना तो माहिती असेल अशी अपेक्षाही करता येत नाही. कारण त्यांना नेहमी इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची सवय आहे.

राहुल गांधी यांच्या आधी कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी, अमित शहा यांनी काश्मीरबाबत बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. त्यावेळची परिस्थिती पाहता युद्धविराम करण्याचा निर्णय लष्कराचा होता. जवाहरलाल नेहरू हे अमित शहांइतके जाणकार नसावेत. त्यामुळे बाकीच्या सर्वांनी चुकीचं केलं आहे. तुम्ही सर्व योग्य करत आहात, मग पाकव्याप्त काश्मीर परत कधी आणणार, असा सवाल केला होता.

Jammu & Kashmir Issue
Anganwadi Worker Strike: अंगणवाडी सेविकांचा १५ डिसेंबरला नागपूरला एल्गार; राहुरी तहसीलवर मोर्चा काढत सरकारला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com