उत्तरप्रदेशातील बुदाऊनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. बुदाऊनमधील वजिरगंज परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या महिलेच्या निधनाचा धक्का तिच्या नवऱ्याला सहन झाला नसल्याने पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसातच तिच्या पतीचा मृत्यू झाला. सध्या मुलाचीही प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले आहे.
उत्तरप्रदेशातील बुदाऊनमधील वजिरगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात शनिवारी एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रजनेश देवी (वर्षे २८) असं या महिलेचं नाव होत. रजनेश देवी तिच्या पती आणि तीन मुलांसह राहत होती. तिच्या अचानक जाण्याने तिच्या पतीला (देशराज ) धक्का बसला. यानंतर तिच्या देशराजची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र त्यानंतर सोमवारी अखेर ३० तासानंतर देशराजने प्राण सोडले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या तीन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची तिन्ही मुलं अनाथ झाली आहेत. पालकांच्या मृत्यूनंतर मुलगा अभि ( वर्षे १२) ची प्रकृती बिघडली आहे. रजनेश आणि देशराज यांना तीन मुले आहेत. या जोडप्याच्या मृत्यूने अभि, मुलगी राणी ( ९ ) आणि सुशील ( ६ ) यांनी त्यांचे पालक गमावले आहेत. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.
सध्या हृदयविकाराच्या त्रासाने ग्रासलेले रुग्ण वाढत आहेत. या त्रासापासून लांब राहायचे असल्यास सर्वात प्रथम खूप तेलकट पदार्थ खाणे टाळा. तसेच सकाळी उपाशी पोटी राहू नका. सकाळी उठल्यानंतर नाश्ता आवश्यक करा. जेणेकरून अॅसीडीटी पासुन लांब राहाल. आणि शिवाय धूम्रपान करणं सुद्धा टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.