
म्यानमारच्या लष्कराने आपल्याच देशातील पश्चिम भागात असलेल्या एका गावावर एअर स्ट्राइक केलाय. यात ४० जणांचा मृत्यू झालाय. म्यानमारमधील गावात सशस्त्र वांशिक अल्पसंख्याक गटाचं या गावावर नियंत्रण आहे. म्यानमारच्या सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ४० लोक ठार झालेत. तर २० जण जखमी झाले, असे गटाचे अधिकारी आणि स्थानिक धर्मादाय संस्थेने ही माहिती दिलीय.
लष्काराकडून करण्यात आलेल्या हल्ल्यातून लागलेल्या आगीत शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. पश्चिम राखीन राज्यातील अरकान आर्मीच्या नियंत्रणाखाली असलेल्या रामरी बेटावरील क्यौक नी माव गावावर बुधवारी हल्ला करण्यात आल्याची माहिती गटाचे अधिकारीने दिलीय. मात्र याबाबत लष्कराकडून या भागात कोणत्याही हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नाहीये. दरम्यान गावातील परिस्थिती काय आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.
मात्र या भागातील इंटरनेट आणि सेलफोन सेवा बंद आहेत. लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये निवडून आलेल्या आँग सान स्यू की यांच्या सरकारची हकालपट्टी केल्यानंतर म्यानमारमध्ये हिंसाचार सुरू झालाय. शांततापूर्ण निदर्शने दडपण्यासाठी लष्कराने प्राणघातक शक्तीचा वापर केल्यानंतर लष्करी राजवटीच्या अनेक विरोधकांनी शस्त्रे हाती घेतली आहेत. देशाचा मोठा भाग हतबल झाला आहे. संघर्षात अडकले.
म्यानमारच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याची माहिती आरकन दलाचे प्रवक्ते खैईंग थुखा यांनी दिलीय. जेट फायटर विमानांनी बुधवारी गावावर बॉम्बचा वर्षाव केला. यात ४० नागरिकांचा जीव गेला आहे तर २० पेक्षा जास्त जण जखमी झालेत. मृत झालेल्या सर्व जण नागरिक होते. तर जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर एअर स्ट्राइकमुळे गावातील घरांना आग लागली. यात ५०० पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत, अशी माहितीही खैईंग थुखा यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.