दसऱ्याच्या (Dasara 2023) आनंदात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या (Jharkhand Car Accident) देवघरमध्ये कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास झारखंड पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या देवघर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कार पुलावरून थेट कालव्यामध्ये कोसळली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी कार कालव्याबाहेर काढली. या अपघाामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अपघातग्रस्त कारमधून एकाच कुटुंबातील ५ जण प्रवास करत होते. हे सर्वजण गिरीडीहवरून आसनसोलला जात होते. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. पुलावरील संरक्षण भिंत तोडत कार कालव्यामध्ये कोसळली. या घटनेनंतर झारखंडच्या चित्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.