Hitendra Thakur: ऑफिसमध्ये येऊन फटकावेल; पाणीप्रश्नावरुन आमदार हितेंद्र ठाकूर आक्रमक, पालिका अधिकारी,आयुक्तांना दिला इशारा

Hitendra Thakur News: स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विरारमध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर हे पालिका अधिकारी व आयुक्तांवर भडकलेले पाहायला मिळाले.
Hitendra Thakur
Hitendra Thakur Saam tv
Published On

Hitendra Thakur News: आज देशभरात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विरार महापालिकेच्या हद्दीतही स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिनाचं औचित्य साधून विरारमध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर हे पालिका अधिकारी व आयुक्तांवर भडकलेले पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

विरारमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर भरलेल्या जनता दरबारात आमदार हितेंद्र ठाकूर हे पालिका अधिकारी व आयुक्तांवर भडकले. जनता दरबारात अनेक नागरिकांनी पाणीप्रश्नावर अधिकाऱ्यांना प्रश्न केले.

मात्र, अधिकारी फिरवून फिरवून उत्तर देत असल्याने आमदार हितेंद्र ठाकूर हे थेट पालिका आयुक्तांवर भडकले. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे इतर अधिकाऱ्यांनी न देता आयुक्तांनी द्यावी असा आग्रह केला .

Hitendra Thakur
Sharad Pawar Beed Sabha: शरद पवारांच्या टार्गेटवर अजित पवार गटाचा दुसरा नेता, बीडमध्ये करणार शक्तिप्रदर्शन

दरम्यान, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शिव्या देत आपला संताप व्यक्त केला. पालिका आयुक्तांनी प्रशासन काळात सत्यानाश केला आहे, असं म्हणत ठाकूरांनी आयुक्तांना ऑफिसमध्ये येऊन फटकावेल असा इशारा दिला. आज स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमात ठाकूर आक्रमक झाल्याने साऱ्याच पालिका अधिकाऱ्यांच्या मनातली धाकधूक वाढली होती.

Hitendra Thakur
Nawab Malik News: नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला? सुप्रिया सुळेंनंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली भेट; निर्णयाकडे लक्ष

राज्यात काही ठिकाणी पाणीपुरवठा दिवसाआड

दरम्यान, राज्यात अनेक जिह्यात यंदा पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा होतोय, तिथं दोन दिवसाआड तर जिथं दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

तसेच ज्या ठिकाणी तिथं तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. धरणात जलसाठा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागेल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com