"त्या' विद्यार्थ्यांकरीता आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा घ्या; अन्यथा आंदोलन करु'

सरकारच्या गोंधळ कारभारामुळे महाराष्ट्रातील हजारो होतकरू विद्यार्थी हे परीक्षा पासून वंचित राहिले
Sadabhau Khot
Sadabhau KhotSaamTV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेत (Health department exams) अनेक केंद्रावर गोंधळ झाल्याचा प्रकार हा दिसून आला होता. शहरातील काही केंद्रावर परीक्षा उशिरा सुरू झाल्याचे गोंधळ तर काही केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना हे पेपर देण्यापासून वंचित रहावे लागले. तर पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटीचा प्रकार ही घडला.

सरकारच्या गोंधळ कारभारामुळे महाराष्ट्रातील हजारो होतकरू विद्यार्थी हे परीक्षा पासून वंचित राहिले. तरी सरकारने या विद्यार्थ्यांकरीता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करू सरकार विरोध आंदोलन करू असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला आहे.

Sadabhau Khot
कोरोनामुळे् घरातील सदस्य गमावलेल्या 1700 कुटुंबांचा शोध घेऊन केला अनोखा उपक्रम !

मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागाचे पेपर फुटल्याच्या तसेच परीक्षा केंद्रावरती योग्य नियोजन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळाला तसेच काहींचा तर पेपरच चुकल्याच्या घटना घडल्या आहेत या सगळ्या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता अशातच आता सरकारने या विद्यार्थ्यांकरीता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com