बाळासाहेब 'वंदे मातरम' म्हणायचे; शिंदे सरकारमधील मंत्र्याच्या निर्णयाचं शिवसेनेकडून समर्थन

'वंदे मातरम' म्हटलंच पाहिजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) संभाषणाला सुरुवात करताना वंदे मातरम म्हणायचे. '
Balasaheb Thackeray / Eknath Shinde
Balasaheb Thackeray / Eknath ShindeSaam TV

मुंबई: एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्र्यांचं काल खातेपाटप झालं या खातेवाटपानंतर सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी लगेच एक महत्वाची घोषणा केली ती म्हणजे, यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता 'वंदे मातरम्' म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील.

मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणेमुळे आता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर 'वंदे मातरम' (Vande Mataram) म्हणायला रझा अकादमीने देखील विरोध केला आहे. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) मात्र शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या या निर्णयाच स्वागत केलं आहे.

पाहा व्हिडीओ -

राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि सत्तांतर झालं. तेंव्हापासून शिंदे विरुद्ध ठाकरे असे शिवसेनेमध्ये दोन गट पडले. दोघेही आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती चालत असल्याचं सांगतात. त्यामुळे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांचं समर्थन देखील दोन गटांकडून केलं जातं.

अशातच आता वंदे मातरम हा मुद्दा देखील आपलाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्नंच खैरे यांनी केला आहे. या निर्णयाबाबत खैरेंनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'वंदे मातरम' म्हटलंच पाहिजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) देखील संभाषणाला सुरुवात करताना वंदे मातरम म्हणायचे. मी युती सरकारमध्ये मंत्री होतो, मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपिनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. आम्ही त्यावेळी जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम् म्हणायचो असं खैरे म्हणाले.

कायद्याने बंधन घालणं अयोग्य - भुजबळ

Balasaheb Thackeray / Eknath Shinde
आणखी २ वर्षांचा काळ, शिवसैनिकांची नाराजी दूर करू; शिंदे गटातील खासदाराचं वक्तव्य

शिवाय बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे हे देखील वंदे मातरम म्हणतात आणि आपण वंदे मातरमचं स्वागत करत असून वंदे मातरम म्हटलंच पाहिजे असं म्हणत खैरे यांनी एकप्रकारे मुनगंटीवाराच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे.

दरम्यान, याच प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, या निर्णयामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही. काही जय हिंद बोलता काही जय महाराष्ट्र बोलतात. एकनाथ शिंदेंना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात. आता त्यांना विचारा फोन केल्यावर काय म्हणायचं, आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचा भान ठेवायला हवं असा टोलाही त्यांनी यावेळी मुनगंटीवारांना लगावला. शिवाय कायद्याने असं कुणावर बंधन घालणं योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार लोक बोलतात असंही भुजबळ म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com