...अन्यथा भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; मलिकांचा धमकीवजा इशारा

काही बातम्या येत आहेत की आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी (President Election) नितीश कुमार यांचं नाव चर्चेत आहे.
Nawab Malik
Nawab MalikSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: देशात सध्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपुर्वी तेलंगणाचे मुंख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आले होते. त्यापुर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या आणि तेव्हापासून काँग्रेसला सोडून तिसरी आघाडी होण्याच्या चर्चांना उघान आले आहे. त्यावेळ ममत बॅनर्जी (Mamata Banerji) यांनी काँग्रेसला सोडून तिसरी आघाडी करण्याची गरज असल्याचं म्हटलं होते. यावर आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रतिक्रिया आली आहे. देशात एक पर्याय उभा राहिला पाहिजे. काँग्रेस शिवाय हा पर्याय नसणार आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. २०२४ आधी हा पर्याय तयार होईल असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

अन्यथा भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही...

एखादी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही मंडळी तिला बदनाम करण्याचं काम करत आहेत. घाणेरडे राजकारण भाजपच्या लोकांकडून सुरू आहे. हत्येबाबत राणे कुटुंबीय बोलतायत त्यांचा तो अनुभव आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्रीचे कुणाशी संबंध आहेत हे आम्हाला उघड करायला लावू नये नाही तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा धमकीवजा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

Nawab Malik
Disha Salian Death Case:...तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू आणि याला जबाबदार हे असतील, पाहा दिशाची आई असं का म्हणाली?

काही बातम्या येत आहेत की आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी (President Election) नितीश कुमार यांचं नाव चर्चेत आहे. जोपर्यंत ते भाजप सोडत नाही तोपर्यंत चर्चा नाही. भाजपची सत्ता पाच ही राज्यात येणार नाही. धर्माचे राजकारण 1993 पासून सुरू केले तेव्हा जनतेने भाजपला बाहेर केले. पाच वर्षात हेच झालं, युपीमध्ये भाजप 150 हून कमी जागा येतील असे विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती निवडणूक सोपी नाही, यावर सगळे राजकीय पक्ष भेटतील, चर्चा होईल. अजून नावावर चर्चा नाही, पाच राज्यांच्या निवडणूकांनंतर नावावर चर्चा होईल. नितीश कुमार यांना जर राष्ट्रपती होण्याची इच्छा असेल तर त्यांनी भाजपाला सुट्टी द्यावी असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

वक्फ बोर्ड जमीन घोटाळा...

वक्फ बोर्डाची हजारो एकर जमिनीवरील मालकी खालसा करण्यात आल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ज्या तक्रारी झाल्या आहेत त्यानुसार 1200 एकर जमीनीचे प्रकरण आहे. एका प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्याने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे 100 एकर जमीन खरेदी केली. बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत एसआयटी नियुक्त करण्यात आली आहे. काही लोकांना अटक झाली आहे टप्प्याटप्प्याने कारवाई होईल असे नवाब मलिक म्हणाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com