
मुंबई: बंडखोरी केलेल्या आमदारांना महाराष्ट्रात फ्लोअर टेस्टसाठी यायचे आहे, असा इशारा शिवसेनेचे (ShivSena) आमदार सचिन अहिर यांनी आज पुण्यात दिला. आमदार अहिर आज पुण्यात शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
शिंदे गटातील आमदांनी मातोश्रीवर संपर्क केल्याच्या प्रश्नावर बोलताना अहिर म्हणाले, मला काही माहिती नाही. मी कोणाला संपर्क केला नाही. मातोश्रीवरून तुम्हाला याची माहिती मिळू शकते.
शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणी आता एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदारांचे निलंबन आणि गटनेता यांच्यावरील कारवाई विरोधात आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. उद्या या संदर्भात सुनावणी होणार असल्याचे बोलले जात आहे, यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना कोर्टात रंगणार आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेत अभी फूट पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे आता मुंबईसह राज्यभरात मेळावे घेण्यात येत आहेत. आज दहीसर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीका केली.
'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा प्रयत्न हाणून पाडत आहे, त्यामुळेच शिवसेनेला संपण्याचा कट शिजत असल्याचेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.