मुंबई: शिवसेनेतील (ShivSena) ४० आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत जात शिंदे गट सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे.
'माननीय शिवसेना आमदार महोदय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन, युती झाली तर पुढची साडेसात वर्षे सत्तेची मग शिवसेनेला त्यात मुख्यमंत्रीपद असणार का? बहुमताची चाचणी करण्याअगोदर पक्ष प्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदे साहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये, असं ट्विट (Tweet) दिपाली सय्यद यांनी केले आहे.
भाजप (BJP) आणि शिंदे गट एकत्र येत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमताची चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यात सत्तापालट होणार असल्याचे बोलले जात आहे.
आज गुवाहाटीमध्ये असलेले बंडखोर आमदार गोव्याला जाणार आहेत, आणि उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक थोड्यावेळात सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या पत्राला आव्हान देण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.