२४ तासांमध्ये शिंदे गट 'मविआ' सरकारचा पाठिंबा काढणार, राज्यपालांना पत्र पाठविण्याची शक्यता

भाजपने आपल्या सर्व आमदारांना परवा मुंबईत येण्याच्या दिल्या सुचना.
Maharashtra Political Crisis Eknath Shinde
Maharashtra Political Crisis Eknath ShindeSaam TV

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आज सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. बंडखोर आमदारांचे निलंबन सध्या तरी होणार नसून, याबाबतची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. शिवाय बंडखोर आमदारांवर तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे बंडखोरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या राजकीय हालचालींना आजच्या निकालानंतर वेग आला आहे. शिंदे गटाने आज महत्त्वाची बैठक घेतली असून या बैठकीमध्ये येत्या २४ तासांमध्ये महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याबाबतचे पत्र ते राज्यपालांना पाठविणार असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेते मुंबईला येणार असल्याची माहिती देखील समोर येत असून राज्यपालांची भेट घेऊन ते फ्लोर टेस्टची मागणी करणार असल्याचंही समजतं आहे. एकीकडे शिंदे गटाची बैठक झाल्याचं समोर येत असतानाच, भाजपने (BJP) देखील आपल्या सर्व आमदारांना दोन दिवसांमध्ये मुंबईत येण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीचे नेते ते टीकणार की भाजप आणि बंडखोर मिळून ते पाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com