मुंबई: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी किरीट सोमय्या प्रझेंटेशन घेऊन दिल्लीला जात आहेत. आजही ते दिल्लीला गेले आहेत. माझं गेल्या दोन महिन्यांपासून ते काय करत आहेत यांच्याकडे लक्ष आहे. मुंबईला महाराष्ट्रासपासून वेगळ करण्यासाठी मुंबईतील धनधांगडी लोक प्रयत्न करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मागिल काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
मी कोणतेही आरोप विना पुराव्याचे करत नाही. आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे घेऊन ते पैसे राज्यपाल भवनात भरले नसल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, असा दावा आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राऊत यांचे काल दिल्लीतून मुंबई येथे आगमन झाले झाले. शिवसेनेकडून (Shivsena) रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. (INS Vikrant scam News)
काल झालेलं समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही हा लोकांचा संताप आहे, काल सेनेचे राज्यात आंदोलन झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जाते, त्यांच्याविरोधातील हा संताप आहे. असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.