वांद्रे वरळी सी लिंकवर आजपासून प्रवास करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास करण्यासाठी अधिकचा टोल भरावा लागणार आहे. तीन वर्षांनी टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. जवळपास १८ टक्के ही टोल वाढ असणार आहे. यामुळे मुंबईकरांच्या खर्च वाढणार आहे.
नव्या टोल दरांनुसार, कार आणि जीपसाठी एकेरी प्रवासासाठी आजपासून १०० रुपये टोल असणार आहे. जो यापूर्वी ८५ रुपये होता. तर मिनी बस, टेम्पो आणि त्या प्रकारातील इतर वाहनांसाठी १६० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी या वाहनांवर १३० रुपये द्यावे लागत होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टू-एक्सल ट्रकसाठी २१० रुपये टोल आकारला जाईल. ज्यासाठी याआधी १७५ रुपये द्यावे लागत होते. वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल शुल्काचे नवीन दर आज म्हणजेच १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. तर हे दर ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहतील.
वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलची अॅडव्हान्स ५० कूपन घेणाऱ्या वाहनधारकांना १० टक्के एवढी सूट मिळणार आहे. तर १०० कूपन खरेदी केल्यास टोलच्या एकूण रकमेवर २० टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तसेच मासिक पासही सवलतीत मिळेल, असं एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.