Ahmednagar Water Supply: पाणीबाणी ! उत्तर नगर जिल्ह्यात 50 गावांना 43 टँकरद्वारे पाणीपुरवठा
- सचिन बनसाेडे
अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी अनेक तालुक्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याचाही प्रश्न निर्माण झाल्याने नागरीकांसह शेतकरी हवालदिल झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यापासूनच नगर जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टॅंकर संगमनेर तालुक्यात सुरू आहेत. तर अकोले, राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.
राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावामध्ये देखील पाणी टंचाई असून ग्रामस्थांना मागील काही दिवसांपासून एक ते दोन किलोमीटर पायी चालत जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत गावातील काही भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
उत्तर नगर जिल्ह्यात तालुकानिहाय टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेले गाव
१) संगमनेर - ( गाव ३६ ) - एकूण २७ टँकर
२) अकोले - ( गाव ४ ) - एकूण ६ टँकर
३) कोपरगाव - ( गाव ४ ) एकूण ४ टँकर
४) राहाता - ( गाव - १ ) एकूण १ टँकर
५) नेवासा - ( गाव - ५ ) एकूण ५ टँकर
50 गावांना 43 टँकरने पाणीपुरवठा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.