जव्हार येथे कालबाह्य एसटी बस दरीत कोसळून ४० प्रवासी जखमी
बस अचानक बंद पडल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात
जखमी प्रवाशांवर जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू
कालबाह्य बसमुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे मोठा अपघात घडला आहे. जव्हार मधील चोथ्याची वाडी येथे ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळच्या सुमारास ११ वाजता घडला. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कालबाह्य झालेल्या बसचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता जव्हार - ऐना- मेढा ही बस जव्हार बस डेपोतून सुटली. या बसमधून ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. ही बस डेपोतून निघाली, मात्र चोथ्याच्या वाडी येथे येताच अचानक बंद झाली. यामुळे बस चालकाने बसचा सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बस कालबाह्य झालेली असल्याने या बसचे सर्वच यंत्रणाने कामे करणे बंद केले.
त्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी बाजूला असलेल्या दरीत कोसळली. या बसने तीन कोल्यांड्या खाल्याने बस मधील ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असून या जखमींवर जव्हार येथील पतंगशहा कुटिर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाचे म्हणजे जव्हार तालुका हा दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने या ठिकाणी सुसज्ज रस्ते नाहीत. त्यामुळे मोठ्या गाड्या चालवणे अवघड जाते. मात्र जव्हार बस डेपोत सगळ्या बस या कालबाह्य झालेल्या आहेत. या कालबाह्य झालेल्या बस चालवताना चालकांचा जीव मेटाकुटीला येतो. असे असताना बस महामंडळ हे प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.