देवेंद्र फडणवीस म्हणतात; तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावू...

राज्यसरकारने 5 आणि 6 जुलै 2021 या दोन दिवसांत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आला.
देवेंद्र फडणवीस म्हणतात; तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावू...
देवेंद्र फडणवीस म्हणतात; तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावू...twitter/ @ANI
Published On

मुंबई : हे सरकार एक दिवस आपोआप पडेल, तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावू. ज्या दिवशी सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्यातील जनतेला पर्याय देऊ, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यसरकारने दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशनाच Rainy convention प्रस्ताव ठेवला आहे. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसकारवर निशाणा साधला आहे.

राज्यसरकारने 5 आणि 6 जुलै 2021 या दोन दिवसांत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आला. मात्र या मुद्द्यावरून विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक झाला आहे. कोविड 19 चे कारण सांगून सरकार नेहमी विधानसभा अधिवेशन होऊच नये, असे सरकारला वाटते. आज शासनाने पुन्हा पावसाळ्याचे अधिवेशन 2 च दिवस प्रस्तावित केले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी किंवा निषेध करण्यासाठी किंवा शपथविधी सोहळ्यासाठी हजारो लोक येतात. मग अधिवेशन का होऊ शकत नाही. पण शेतकरी आणि मराठा आरक्षणासंबंधी अनेक प्रश्न प्रलंबित आहे, यावर चर्चा करण्यासाठी सरकारला वेळ नाही, याच कारणाने विरोधी पक्षाने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर पडलो.

देवेंद्र फडणवीस म्हणतात; तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावू...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै पासून

तीन पक्षाच्या मंतभेदांमध्ये जनतेचा बळी जातोय, 2 दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे सोडवणार, असा सवाल आम्ही या सरकारला जनतेमध्ये जाऊन विचारणार आहे. आता आम्ही शांत बसणार नाही, आणि सहनही करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच मराठा आरक्षण रद्द होण्याला राज्यसरकारच जबाबदार आहे. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी हे सत्तेत आहेत, बाहेरून मतभेद असल्याचे दाखवत असले तरी आतून हे सगळे एक आहेत', अशी टीकाही फडणवीस यांनी केली. याशिवाय राज्यात दारूची दुकाने सुरू आहेत, मात्र मंदिरे बंद आहेत, सरकारसाठी दारूची दुकाने महत्त्वाची आहेत. त्यात आता दारूच्या नवीन दुकानांनया परवाने द्यायचा राज्य सरकार घाट घालत आहेत, याला आम्ही विरोध करणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com