Maharashtra Politics : कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार, कोणता पक्ष किती जागांवर लढणार?

When will the Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मविआ आणि महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेय.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Saam Tv
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. राज्यातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, सोमवारी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024 date Mumbai)

2019 विधानसभा निवडणुकीपेक्षा आताची परिस्थिती वेगळी आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे भाजपसोबत होते, तर अजित पवार (Ajit Pawar) हे काँग्रेससोबत (Congress) होते. पण मागील चार वर्षांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. आधी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत (BJP) फारकत घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. पण त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी मविआ आणि महायुती यांच्यामध्ये लढत होणार आहे. युती आणि आघाडीचे जागावाटप आता जवळपास पूर्ण झाल्याचं बोललं जातेय. पण कोण किती जागांवर लढणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (Elections to be held before November 26)

महायुतीचं जागावाटप कसं होणार? कोण किती जागांवर लढणार ? mahayuti seat-sharing formula in maharashtra

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीचं जागावाटप होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. त्याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन ते तीन दिवसांत जागावाटप पूर्ण होईल, असे संकेत दिले होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपचा फॉर्म्युला ठरलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १२६, शिंदे गट ९० आणि अजित पवार गट ७२ जागांवर लढण्याची शक्यता आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी राज्य विधानसभेच्या २८८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत एकमत झाले आहे. दिल्लीतील भाजप नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बोलणी करून अंतिम घोषणा दोन दिवसात होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मविआत कोण सर्वाधिक जागा लढणार? mva maharashtra seat sharing formula

महाविकास आघाडीचं जागावाटपही जवळपास पूर्ण झाले आहे. २८८ पैकी २२० जागांवर तिन्ही पक्षाचे एकमत झालेय. विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर पेच आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये बैठका सुरु आहेत. पुढील काही दिवसांत याचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर ठाकरे आणि शरद पवार यांनाही सन्मानजनक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस ११०, ठाकरे ९० ते १०० आणि शरद पवार ८० ते ८५ जागा लढवण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली आहे. पुढील आठवड्यात जागावाटपाबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

यंदा राज्यात निवडणुका कधी ? 2024 Maharashtra Legislative Assembly election

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याचा दौरा केला होता. महायुती आणि मविआच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठका घेतल्या होत्या. त्याशिवाय निवडणूक घेण्याची तयारी कसा असेल, याचाही आढावा घेतला होता. सोमवार अथवा मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. त्यादिवसांपासून आचारसंहिता लागू शकते. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानुसार, राज्यात दोन टप्प्यातही निवडणुका होऊ शकतात.

२०१९ मध्ये कधी झाली होती निवडणूक? 2019 Maharashtra Legislative Assembly election

२१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्यावेळी राज्यात ६१.४ टक्के मतदान झालं होतं. त्यावेळी एकसंध शिवसेना आणि भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले होते. पण ठाकरेंकडून महाविकास आघाडीची चाहूल मिळाली, देवेंद्र फडणवीस यांनीही २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार उप मुख्यमंत्री झाले होते. पण बहुमत चाचणीआधीच हे सरकार कोसळलं. २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण दोन वर्षानंतर शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत सूरतवरुन गुवाहाटी गाठली. सरकार अल्प मतात आल्यामुळे ठाकरेंनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर निघत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार हे महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com