Pandharpur News: विठोबाच दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून भाविक देवाचा लाडू घरी घेऊन जातात. पण सध्या समितीकडून पॅकिंग ऐवजी थेट हातात हे लाडू दिले जात असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आषाढी यात्रे पूर्वीच हा ढिसाळ कारभार समोर आला आहे. (Latest Marathi News)
देवाचं दर्शन झालेल्या भाविकाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून प्रसाद रुपात वीस रुपयात दोन बुंदीचे लाडू दिले जातात. समितीच्या मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रातून याची विक्री होते.
सध्या ठेकेदार पद्धत बंद करुन समिती सध्या लाडू प्रसाद बनवत आहे. पूर्वी ठेकेदार असताना पॅकिंग मध्ये प्रसाद दिला जायचा. समिती कडून मात्र स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. याच पावित्र्य जपल जात नाही.
दोन पेक्षा अधिक लाडू हातात कसे न्यायचे, अशी तक्रार करत भाविकांनी समितीच्या कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त केली. लाडू सारखा प्रसाद पॅकिंगमध्ये देण्याची मागणी ही भाविकांनी केली आहे.
पंढरपूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याचा त्रास बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना सहन करावा लागत आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात येणार्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे.
सततच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सरगम चौक, नगरपालिका आणि सावरकर चौक या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्याची वारंवार मागणी करून वाहतूक शाखा व नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. पोलिसांनी पंढरपूर शहरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.