Vijay Wadettiwar : 'अशा वाऱ्यामुळे कोकणातला नारळही पडत नाही'; राजकोट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Vijay Wadettiwar On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ४५ किमी वेगाने वारे वहात होते, त्यामुळे राजकोटमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा दावा केला होता, त्यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Vijay Wadettiwar: 'शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत बियाणे द्या', काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी; राज्यातील दुष्काळावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा!
Vijay Wadettiwar|Maharashtra Politics Saam tv
Published On

४५ किमी वेगाने वारे वाहले तरी कोकणातला नारळ पडत नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात वादळामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्रात असे कित्येक पुतळे आहेत, जे वादळ वाऱ्याचा सामना करत कित्येक दशकं जसेच्या जसे उभे आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा अजब असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला होता. त्याचे राज्यात तीव्र पडसाद उपटले आहेत. दरम्यान काल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देताना, जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. मात्र कोकणात पाऊस आणि जोरदार वारे वाहात होते. तासी ४५ किमी वेगावे वारे वहात असल्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा दावा केला होता.

खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर इतक्या निकृष्ट दर्जाचं काम कसं होऊ शकतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र निकृष्ट दर्जाचं काम करून यांनी महाराजांचा पुतळा यांनी पाडला आहे, भविष्यात महायुतीचे हे भ्रष्टाचारी सरकार याच मातीत गाडले जाईल, असा घणाघातही त्यांनी केला. राज्यातील सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्याचा बदला घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

Vijay Wadettiwar: 'शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत बियाणे द्या', काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी; राज्यातील दुष्काळावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा!
Nana Patole : 'हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला'; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलं होतं. प्रत्येक शिवप्रेमींचा ऊर अभिमानानं भरून आला होता, मात्र अवघ्या 8 महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे त्याच शिवरायांसमोर मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ आली आहे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर जयंत पाटील यांनी, जे काम औरंगजेबाला त्याच्या संपूर्ण हयातीत जमलं नाही, ते या महायुती सरकारने करून दाखवलं आहे, असा आरोप केला आहे.

Vijay Wadettiwar: 'शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत बियाणे द्या', काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी; राज्यातील दुष्काळावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा!
Nandurbar Crime: बदलापूरनंतर नंदूरबार हादरले! शाळेच्या सफाई कर्मचाऱ्यानं १० वर्षांच्या मुलीला मोबाइलवर दाखवले अश्लील व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com