
मुंबई-नाशिक महामार्गावर शनिवार आणि रविवारच्या दिवशी रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डीतील रेल्वे ब्रिजजवळ रस्त्याच्या कामामुळे एकतर्फी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पण या मार्गावर छोटे वाहने समोरासमोर येत असल्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी, महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.
शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असल्यामुळे मुंबई हून नाशिक आणि नाशिक हून मुंबई कडे जाणारे लोक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, महामार्गावर दुरुस्तीची कामे या दोन दिवसांतच केली जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढते. नोकरदार तसेच विकेंडला फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तरीदेखील, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने या समस्येचे निराकरण होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवार व रविवार सोडून इतर दिवशी महामार्गावरील दुरुस्तीची कामे करण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.