पुरग्रस्तांची परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सरकार कामाला लागलं आहे - अजित पवार

पुरग्रस्त भागातील सर्व परिस्थिती पहिल्यासारखी सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पुर्णपणे कामाला लागलं असल्याचही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
पुरग्रस्तांची परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सरकार कामाला लागलं आहे -अजित पवार
पुरग्रस्तांची परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सरकार कामाला लागलं आहे -अजित पवारSaam Tv

पश्चिम महाराष्ट्राचा पाहणी दौरा झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पुरग्रस्त भागातील सर्व परिस्थिती पहिल्यासाखी सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पुर्णपणे कामाला लागलं असून ज्या ज्या भागात जेवढं नुकसान झालं आहे त्या सर्व घटकांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत असही अजित पवार म्हणाले.The government has started working to improve the situation of flood victims - Ajit Pawar

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटीलJayant patil तसेच हसन मुश्रीफ,Hasan mushrif सतेज पाटील हे नेतेसुद्धा उपस्थित होते.Satej patil

आत्ताचा पाऊस हा न भुतो न भविष्यते प्रकारचा होता 2 दिवसात प्रचंड 32 इंच इतका पाऊस Heavy Rain पडला यामुळे या पाण्याचा अंदाज न आल्याने पश्चिम महारष्ट्राचWest Maharashtra आणि प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर(Sangali Kolhapur) शहरांच मोठ्या प्रमाणावर नुकसानBigLoss झालं असल्याचही पवारांनी सांगितलं. नुकसानग्रस्त सर्व घटक मग त्यामध्ये व्यापारी,MerchantशेतकरीFarmers, लहान दुकानदार या सर्वांना हवी ती मदत करण्याच्या सुचना तेथील जिल्हाधकाऱ्यांना दिल्या असल्याचही त्यांनी सांगितलं. प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे कामं केल्याचही अजित पवारांनी सांगितलं.

कोल्हापुर सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर

या महापुराचा सर्वाधिक फटका कोल्हापुर सांगली शहरांना बसला आहे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर कराव लागलं तसेच शिरोळ तालुक्यातील नागरिकांच जनावरांचही मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्याचही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय या भागामध्ये चारा छावण्या तेथील सहकारी कारखान्यांनी सुरु केल्या असून पुरग्रस्तांना वर्षभराच रेशन देण्याचीही सरकारची माणसिकता असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.

पुरग्रस्तांची परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सरकार कामाला लागलं आहे -अजित पवार
अहवाल आल्यावर राज्यसरकार अंतिम मदत जाहीर करेल : शरद पवार

कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय.

दरम्यान अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत आपण चर्चा केली आणि त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला असल्याचही पवार यावेळी म्हणाले. तसेच याबाबत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील कर्णाटक सरकारशी सतत चर्चा करत असल्याचही उपमुख्यमंत्री म्हणाले.

नँशनल हायवे-4 ची उंची वाढविणार

कोल्हापूर सांगली नँशनल हायवेची उंडी वाढविण्यासाठी नितिन गडकरींची मदत घेणार. नँशनल हायवे 4 च्या उंची वाढविण्याबाबत आणि त्या ठिकाणी उड्डाणपुलांच्या उंचीवाढविण्यासदर्भात चर्चा करणार असल्याचही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून पुरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी बेैठक आयोजित केली असल्याचही अजित पवारांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com