
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले. या परीक्षेत जव्हार तालुक्यातील आदिवासी मुलाने यश मिळवले आहे. त्याच्या गावात त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या गावातील मुलगा आयएएस झाला म्हणून सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला.
जव्हार तालुका म्हणजे कुपोषणाचा तालुका अशी ओळख आहे. मात्र ही ओळख आता गावातीलच तरुणांनी पुसून काढली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोगदे गावातील सुपुत्र डॉ. अजय काशीनाथ डोके यांने UPSC परीक्षा पास केली आहे. त्यांनी 364 रँक प्राप्त केली आहे. त्यांनी स्वतः ची IAS म्हणून नवीन ओळख निर्माण केली आहे.
कोकण विभागातून आदिवासी समाजाचे पहिलेच IAS अधिकारी झाले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोगदे गावातील ग्रामस्थांनी डॉ. अजय काशीनाथ डोके यांच्या सह त्यांच्या आईवडिलांची वाजत गाजत मिरवणूक काढली. गावात रांगोळी काढत आदिवासी पारंपरिक नुसार सांबळी वाजवत मिरवणूक काढण्यात आली.
डॉ अजय डोके यांनी कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता तीन वेळा upsc पास केली आहे. परंतु त्यांना IAS पद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या या यशामुळे आदिवासी कोगदा गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. याआधीही कोल्हारपूरच्या बीरदेव डोणे या मुलाने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. मेंढपाळाच्या मुलाने हे यश मिळवले आहे. त्यानंतर आता पालघरमधील डॉ. अजय काशीनाथ डोके यांनीदेखील नवा आदर्श निर्माण केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.