'बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय, मात्र सरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करतय'

'जोपर्यंत खेचून काढत नाही तोपर्यंत सत्ता भोगायची ही या सरकारची नीती आहे, इतके आरोप होऊनही यांना काहीच वाटत नाही. आम्ही आहोत म्हणून एवढं तरी आहे नाहीतर हे सरकार काय करेल याचा काही नेम नाही.'
'बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय, मात्र सरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करतय'
'बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय, मात्र सरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करतय'Saam TV
Published On

नागपूर : बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र सरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करत असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. तसंच 'आम्ही घटना मानतो, न्यायालय मानतो, आम्ही महाविकास आघाडी सारखे बोलत नाही, आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालय चांगले, CBI चांगली आणि विरोधी बाजूने निर्णय लागला की भाजपच्या (BJP) इशाऱ्यावर असं महाविकास आघाडीचे आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे, आम्ही न्यायालयीन लढाई लढू, ज्या प्रकारे 12 आमदारांसाठी लढलो त्याप्रकारे लढू' असही पाटील म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या जे बोलतात ते करतात आणि जेव्हा ते म्हणतात त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असतात, सुजित पाटकरच्या कंपनीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्या मुलीची भागीदारी आहे, या बातम्या आल्या आहेत, मी एवढंच म्हणेल की किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडे एवढंच नाही आणखी बरेच काही असल्याचं पाटील म्हणाले आहेत.

'बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय, मात्र सरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करतय'
"नवऱ्याने नीट झोपूही दिलं नाही, मला सेक्स स्लेव बनवलं" भाजप आमदाराच्या सुनेचा गंभीर आरोप

अमृता वहिनी काय म्हणाल्या मला माहित नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यावर मी बोलणार नाही. तसंच निर्णय सरकारच्या विरोधात लागला तर यात भाजपचा हात आहे, असं म्हणायचं आणि त्यातून सहानुभूती मिळवायची, असं सोईचं राजकारण सुरू आहे. एका अर्थाने टोळीचं राज्य सुरू आहे, अतियश मायक्रो प्लॅनिंग सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी महाविकास आघाडीवरती केली आहे.

दरम्यान बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय, दारूच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो, म्हणून ते बोलले. मात्र रोज एखादा नवीन विषय काढायचा आणि लक्ष विचलित करायचा असं महाविकास आघाडी सरकारचं काम सुरू आहे. जोपर्यंत खेचून काढत नाही तोपर्यंत सत्ता भोगायची ही या सरकारची नीती आहे, इतके आरोप होऊनही यांना काहीच वाटत नाही. आम्ही आहोत म्हणून एवढं तरी आहे नाहीतर हे सरकार काय करेल याचा काही नेम नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com