
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील डीपी जळाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात वीज नसल्याने दळण दळण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. मागील 26 दिवसांपासून गावकऱ्यांना पाणी आणि दळणासाठी भटकण्याची वेळ आली असताना प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ (Mohol) तालुक्यातील हराळवाडी (Haralwadi) हे गाव गेल्या २६ दिवसांपासून अंधारात आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावासाठी एकाच कुंपननलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो.
या कुपनलिकेस विद्युत पुरवठा होणारा भगीरथ डीपी 26 दिवसांपूर्वी जळाला आहे. त्यामुळे अबाल वृद्धासह नागरिकांना पाण्यासाठी आणि दळण दळून आणण्यासाठी 3 ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. (Solapur News)
गावात विज नसल्याने नागरिक कामधंदा, व्यापारी आपला व्यापार तर विद्यार्थी शाळा-कॉलेज सोडून पाणी आणि दळणासाठी भटकत आहेत. याबाबत वारंवार कळवूनही गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला काडीमात्र फरक पडत नसल्याने नागरिकांनी आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.