विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना
विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटनाSaam Tv

विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना

रोहित्रावरील विद्युत तार तुटून विजेचा धक्का लागल्याने सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
Published on

औरंगाबाद : रोहित्रावरील विद्युत तार तुटून विजेचा धक्का लागल्याने सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. गेवराई ब्रूक बाँड येथे ही घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील पहा-

मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र गेवराई येथील पगारिया ऑइल मिल आहे. या रोहित्रा वरील विद्युत तार सायंकाळी तुटली होती. याच दरम्यान शेतातून येणारी गाईची झुंड या परिसरात येत होत्या त्यावेळेस विजेचा धक्का लागल्याने एका पाठोपाठ एक अशा सात गाई मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्युत् पुरवठा बंद केला. यानंतर मूर्त काहींना बाजूला काढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना
पंतप्रधान निवास भाड्याने देणे आहे! पाकिस्तान सरकारचा निर्णय

या घटनेत कृष्णा पवार, प्रकाश राठोड, संजय राठोड, संतोष माळवदे, दिलीप मुळे, अमोल केदार आदी सहा शेतकऱ्यांच्या सात गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी काळे यांनी गाईंचा पंचनामा केला. अहवालानंतरच घटनेस कारणीभूत कोण आहे याची माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com