लोकमताचा आदर करता करता मताचा आदर जास्त करू लागलो : जयंत पाटील

Jayant Patil
Jayant Patil
Published On

सांगली : आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता मताचा आदर जास्त करू लागलो. हे बदलण्याची गरज आहे असे स्पष्ट मत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले. येथील पृथ्वीराज फॉउडेंशनच्यावतीने सांगली येथे आयाेजिलेल्या पूर परिषदेत मंत्री जयंत पाटील Jayant Patil बाेलत हाेते. या पूर परिषदेस कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह तज्ञांची उपस्थिती हाेती. 

Jayant Patil
सातारा काेल्हापूर पॅसेंजर सुरु करा; रेल्वे प्रवाशांची मागणी

मंत्री पाटील यांनी सांगलीत आलेल्या पूराविषयी चिंता व्यक्त केली. यंदा २४ तासात झालेल्या माेठ्या प्रमाणात पावसाने हे झाल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु आपल्या भाषणात त्यांनी प्रशासकीय व्यवस्था आणि पुढा-यांमधील मानसिकता यावर प्रकाशझाेत टाकला. ते म्हणाले एखाद्या पोलिसांना काम केले नाही तर त्याची बदली केली जाते. जर एखादा अभियंत्याने बांधकामाला परवानगी दिली नाही तर त्याला मदत करण्याऐवजी त्याच्याकडून काम कसे करुन घेता येईल त्याची आखणी करुन ते करुन घेतले जाते. हे बदलण्याची गरज आहे. आपण आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता मताचा आदर जास्त करू लागलो आहे अशी टिप्प्णी ही मंत्री पाटील यांनी केली.

या पूर परिषदेत मंत्री जयंत पाटील यांच्याबराेबरच कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी त्यांची मते मांडली. त्यानंतर पूर परिषदेत उपस्थित असलेल्या तज्ञांनी मार्गदर्शन केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com