Sanjay Shirsat : वसतिगृहात सर्व जातीधर्माचे मुले एकत्र राहण्यासाठी प्रयत्न; मंत्री संजय शिरसाठ यांची भूमिका

Sambhajinagar News : जातीयता नष्ट होण्याऐवजी ती अधिक बळकट होऊ लागल्यानं त्यावर आता शालेय- महाविद्यालय स्तरावर जाती अंताची सुरुवात करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नवे पाऊल टाकण्याची भूमिका घेतली
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : एसस्सी, ओबीसी, आदिवासी आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहे. हे मुळात चुकत आहे. शालेय आणि महाविद्यालय स्तरावर जाती- जातीचे असलेल्या आश्रम शाळा आणि वसतिगृहमध्ये सर्व जाती- धर्माची मुलं एकत्र राहिली पाहिजे, असा प्रयत्न केला जाणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले. मात्र याला किती लोक स्वीकारतील आणि काय काय अडचण येतील हेही पहाव लागेल असेही शिरसाट म्हणाले.

सध्या जात भावना टोकदार होऊ लागली आहे. जाती- जातीमधला भेद वाढत चालला आहे. जातीयता नष्ट होण्याऐवजी ती अधिक बळकट होऊ लागल्यानं त्यावर आता शालेय- महाविद्यालय स्तरावर जाती अंताची सुरुवात करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नवे पाऊल टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी आता ओबीसी, एससी, ओपन वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेताना एकत्र असले पाहिजे; असे मत त्यांनी व्यक्त केला.  

Sanjay Shirsat
Sangli News : सांगलीत शाळकरी मुले नशेच्या आहारी; सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा

तर जातीवादाचा लवलेश राहणार नाही 

ज्यावेळी सर्व जातीधर्माची विद्यार्थी एकत्र राहतील, त्याच्यामध्ये एकोपा तयार होईल आणि जातीवादाचे द्वेष निर्माण होणार नाहीत अशी कल्पना आहे. जेव्हा ती एकत्र शिक्षण घेतात. एकत्र राहतात त्यावेळेस त्यांचे बंधुत्व, मैत्री वाढेल. भविष्यामध्ये हे पुढे जातील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतील, समाजात वावरतील त्यावेळेला जातीवादाचा लवलेशी त्यांच्यात राहणार नाही. मात्र हे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी काय त्रास होईल किंवा किती लोक याचा स्वीकार करतील हे येणारा काळ ठरवेल; असेही शिरसाठ यांनी स्पष्ट केले.  

Sanjay Shirsat
Bhandara News : रेल्वेसमोर उडी घेत युवकाने संपविले जीवन; देव्हाडी- तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील घटना

विद्यार्थी वसतिगृहांची संख्या वाढली पाहिजे 
जे विद्यार्थी वसतिगृह, आश्रम शाळा आहेत. त्यातील सुविधा वाढवून तिथली संख्या वाढवणे हे पहिले काम असेल. त्यासोबत प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात विद्यार्थी वसतिगृह वाढली पाहिजेत अशी भूमिका आहे. जवळपास २५ हजार मुलांना कसं सामावून घेतलं जाईल; हा विचार करत असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व आमदारांनाही सांगितलं आहे. तुम्ही मला रस्त्यासाठी पैसे मागू नका; तुम्ही मला होस्टेलसाठी पैसे मागा. जर हॉस्टेलसाठी पैसे मागितले तर सरळ हाताने मदत करेन. तुम्ही होस्टेल निर्माण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com