'मराठा आरक्षणा जाण्याला राज्य सरकार जबाबदार; संभाजीराजेंच्या उपोषणाला RPI चा पाठिंबा'

'उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणाची बाजु सुप्रीमकोर्ट मांडता आली नाही. यामुळे आरक्षण गेले आहे.'
Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji Raje Saam TV

अहमदनगर : RPI चा संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा असून, ST आणि OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सुवर्ण समाजाला 10 % आरक्षण भाजप सरकारने दिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) बाजु सुप्रीमकोर्टात मांडता आली नाही. यामुळे आरक्षण गेले आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याच आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी आज केला ते अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलतं होते.

Chhatrapati Sambhaji Raje
Bhagat Singh Koshyari: समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारणार? - राज्यपाल (पहा Video)

दरम्यान, यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये (UP) भाजप 300 जागा पार करणार असल्याचा विश्वास शिर्डीत आठवले यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मायावतीचा जनाधार उत्तर प्रदेश मध्ये कमी होत असुन जनतेचा मायावतीवर विश्वास राहिला नाही. यामुळे लोकांचा रिपब्लिकन पक्षाकडे मोठे लक्ष लागुन असुन रिपब्लिकन पक्षामुळे (RPI) मायावतीचे 25 % मतदान भाजपला होणार असून उत्तर प्रदेश मध्ये भाजप 300 जागा पार करणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com