
सातारा : भाजप (bjp) सोबत मनसेला (mns) घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय (rpi) बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज असा सवाल केंद्रीय मंत्री आरपीआयचे नेते रामदास आठवले (ramdas athavale) यांनी येथे (satara) उपस्थित केला. (Ramdas Athavale latest Marathi news)
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर आणि राज ठाकरेंवर (raj thackeray) टीकेची झोड उठवली आहे. मनसेच्या सभेला गर्दी होत असली तरी मते मात्र मिळत नाहीत. सुरुवातीला निवडणुकीत १३ जागा मिळवणारा मनसे पक्ष आता डाऊन होऊ लागला आहे असे आठवले म्हणाले.
आता जरी मनसेने हिंदुत्ववादी (hindutva) मुद्दा घेतला असला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मनसेची एक जागा निवडून आलेली आहे ती सुद्धा स्वबळावर निवडून आली असल्याचे आठवले यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.