अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण वाढले- विनायक मेटेंचा हल्लाबोल

नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत
अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण वाढले- विनायक मेटेंचा हल्लाबोल
अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण वाढले- विनायक मेटेंचा हल्लाबोलSaam Tv

नाशिक : अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण वाढले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले आहे. धनगर समाजाला देखील आता वाऱ्यावर सोडले आहे. नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत. परंतु, केवळ एका मंत्र्यामुळे ओबीसी आरक्षण गेले, असा हल्लाबोल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी यावेळी केला आहे.

ते नाशिकमध्ये बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचे आणि अपशकुनी आहे. हे सरकार कोणत्या मुहूर्तावर आले आहे, हे माहित नाही. मात्र, त्यामुळे लोक देशोधडीला लागले आहेत, असे टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडले आहे. विनायक मेटे पुढे म्हणाले की, २ वर्षांत आघाडी सरकारने केलेली कामे कोणाला देखील सांगता येणार नाही. कोरोना काळामध्ये सरकारमुळे लोक देशोधडीला लागले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

हे देखील पहा-

सरकार कोणत्या मुहूर्तावर आले हे माहिती नाही. मात्र, सरकार आल्यापासून राज्यामध्ये संकट आहे. हे पालथ्या पायाचे अपशकुनी सरकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने यावेळी केले आहे. कर्जमुक्ती करू असे सांगितले. मात्र, असे काही झाले नाही. सरकार आणि विमा कंपन्यांचे साटलोटे आहेत. शेतकऱ्यांचा मात्र तोटा होत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. आघाडी सरकार नितीन राऊत यांच्या माध्यमामधून लोकांची वीज तोडत आहेत.शब्द पाळायचा नाही, पण विश्वासघात करायचा, हा या सरकारचा स्थायीभाव आहे.

अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण वाढले- विनायक मेटेंचा हल्लाबोल
ममता बॅनर्जी आवर्जून ठाकरे कुटुंबाची भेट घेतात- संजय राऊत

सरकारला सामाजिक दृष्ट्या पाठिंबा नाही. कोणत्याही प्रकारचे समाजाला सरकारचा पाठिंबा नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. फडणवीसांनी मिळवलेले हे मराठा आरक्षण या सरकारने घालवले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत. मात्र, महाराजांच्या स्मारकाकरिता यांनी २ मिनिटे देखील दिले नाहीत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मेटे यांनी यावेळी अशोक चव्हाणांवर देखील यावेळेस जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांनी देखील तोंडाला कुलूप लावले आहे.

अण्णा साहेब महामंडळाचा कारभार ठप्प आहे. मुस्लीम आरक्षणाबद्दल नवाब मलिक एकही शब्द काढत नाहीत. मुस्लीम मूल मोठे व्हावेत याचे त्यांना काही पडलेच नाही. फक्त आपला जावई आणि मुलगी कशी सुरक्षित राहील याच्याशी त्यांना देणे- घेणे आहे. नवाब मलिक, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे घर हाच त्यांचा मुस्लीम समाज आहे, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली आहे. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून देण्याचे काम केले. आता सुप्रिया सुळे का बोलत नाहीत. या सरकार मधील मंत्र्यांमुळे ओबीसी आरक्षण घालवले, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com