
Rajasthan News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. राजस्थानमध्ये लाल डायरीत गेहलोत सरकारच्या काळ्या कारनामांच्या नोंदी आहेत, असा आरोप करत विरोधकांच्या 'INDIA' वरही टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी 'क्विट इंडिया'चाही नारा दिला. (Latest Marathi News)
राजस्थानमधील सीकर येथे गुरुवारी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. पीएम किसान समृद्धी केंद्राचे त्यांनी यावेळी उद्घाटन केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगतलं.
तसेच उपस्थितांना संबोधित करताना पुढे त्यांनी विकोधकांवर हल्लाबोल केला. भारतीय जनता पार्टी हा पक्ष वगळता अन्य पक्षांनी देखील आपल्या पक्षाच्या नावात भारत नाव जोडले आहे. मात्र फक्त भारताचं नाव पक्षात लावल्याने यूपीए पक्षातील वाईट कामं आणि केलेली पापं दूर होणार नाहीत, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.
विरोधकांवर टीका करताना मोदींनी अशोक गेहलोत यांच्यावर सडकून टीका केली आहे. राजस्थानच्या लाल रंगाच्या डायरीमध्ये गेहलोत यांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराची नोंद आहे, असं मोदी म्हणाले. तसेच त्यांनी विरोधकांना उद्देशून क्विट इंडियाचा नारा देखील दिला आहे.
काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी पुढे म्हणाले की, राजस्थान सरकारमधील मंत्र्यांवर पेपर लीक केल्याचे आरोप आहेत. येथील सरकार तरुणाईच्या विरोधात आहे. त्यामुळे जर राज्याला वाचवायचे असेल तर काँग्रेसला येथून हटवावे लागेल. कारण येथे दगडफेक होऊन कधी कर्फ्यू लागेल याचा काहीच नेम नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. असाच नारा आता पुन्हा एकदा देण्याची वेळ आली आहे. भारत छोडोचा नारा दिल्याने देश वाचण्याची शक्यता आहे, असंही यावेळी मोदींनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.