नांदेड : शाहरुख खानने नवाब मलिक आणि संजय राऊतला पगारावर ठेवल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. दोघेही गांजा आणि खानवर बोलत आहेत. ते कोणत्या लेव्हलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा. ते शुद्धीत बोलत नाहीत म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. देगलूर येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी राणे येथे आयाेजिलेल्या जाहीर सभेसाठी आले हाेते. त्यावेळी माध्यमांशी राणेंनी संवाद साधला. sanjay raut shahrukh khan nitesh rane nawab malik drugs nanded news
राणे म्हणाले महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दूर व्हावे लागले. केंद्र सरकारच्या नावाने केवळ महाविकास आघाडी सरकार बाेंब मारत आहे. नाकर्त्या सरकारमुळे मराठा समाजातील मुलांचे भवितव्य अंधारात लाेटले जात आहे.
दरम्यान जाहीर सभेत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या कामावर देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री घरा बाहेरच पडत नाहीत असेही त्यांनी सांगत निवडणुकीपुर्वी शेतक-यांना दिलेल्या आश्वासनाने ते पाळत नसल्याचे राणेंनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.