घाटकोपर : घाटकोपर येथे जनतेशी संवाद साधण्यासाठी आज (रविवार) किरीट सोमय्या kirit somaiya येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील घोटाळे आणि त्यातील विशेषत: नवाब मलिक, शरद पवार आणखीन मोठे मंत्री हे ड्रग काॅंन्ट्रॅक्टरचे प्रवक्ते बनलेत असे म्हटलं. नवाब मलिक इतके अस्वस्थ का झालेत. ड्रग माफियांकडून काही अर्थिक व्यवहार झाले आहेत का, मलिक परिवाराचे शेअर कंपन्या बंद झालेल्या कंपन्या आर्थिक व्यवहारात काही गोंधळ आहे का याचा तपास आता सुरु केलेला आहे असे सोमय्या यांनी नमूद केले. kirit somaiya sanjay raut nawab malik ghatkopar
आर्यन खानचा वडील शाहरुख खान हे भाजपात असते तर ड्रगची पांढरी साखर झाली असती असे म्हटले जात आहे. या प्रश्नावर साेमय्या म्हणाले सध्या शरद पवार, ठाकरे सरकार एकच जप करताहेत हा हलका गांजा हाेता. नवाब मलिक हे म्हणताहेत हा हरबल गांजा असल्याचे सांगत आहेत. काय गमंत चालली आहे का असा सोमय्या यांनी प्रश्न विचारला आहे.
संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडवर साेमय्या काहीच बाेलत नाहीत यावर तीन दिवसांची संजय राऊतची नशा उतरली का असा प्रतिप्रश्न साेमय्या यांनी केला. तीन दिवस साेमय्या यांना लिहिलेल्या पत्राची प्रत दाखवत हाेते. त्यात साेमय्या खूप चांगले काम करीत आहेत असे लिहितात. काेणत्या नशेत राऊतने पत्र लिहिले. मी संजय राऊत यांना विचारले इडी ऑफिसला जाऊन पंचावन्न लाख परत केले या विषयी त्यांनी बोलावे असे साेमय्या यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.