नांदेड : देगलूर बिलोली मतदारसंघाचे भाजपा उमेदवाराच्या प्राचारार्थ भाजपा नेते नितेश राणे यांची कुशहावाडी येथे आज (रविवार) जाहीर सभा झाली. या सभेत राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत. किती बायकाेवर प्रेम करायचे यालाही मर्यादा आहेत. आमची काय लग्न झाली नाहीत? एकाचेच लग्न झाले आहे का महाराष्ट्रात आणि ताेच बाहेर येत नाही असे राणेंनी नमूद केले. nitesh-rane-nanded-political-rally-uddhav-thackeray-bjp-shivsena-news-sml80
ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत आणि चुकुन आलेच तर पुन्हा 15 मिनीटांनी पुन्हा आत जातात. काय चाललयं आहे आतमध्ये. निवडणुकीपुर्वी शेतक-यांना दिलेली आश्वासने पाळली जाताहेत का असा प्रश्न राणेंनी उपस्थितांना केला.
अतिवृष्टीच्या काळात नुकसान झालेल्या शेतक-यांना महाविकास आघाडी सरकारने काेणत्या ही प्रकारची मदत केली नाही. पीक विम्याच्या कंपन्यांनी देखील शेतक-यांना पाने पुसली आहेत. पीक विमा कंपन्यांनी रस्त्यावर आणून त्यांना वठणवीर आणू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहाेत. जे बाेलताे ते करताे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.