अक्षय बडवे
Ajit pawar News: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे. स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारसू येथे अनेक राजकीय नेत्यांना येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारसूमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार, असं म्हणत शिंदे सरकारला आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)
पुण्यात क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानातर्फे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची उपस्थिती दर्शविली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बारसू प्रकल्पावरून शिंदे सरकारला आव्हान दिलं आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले ,'उद्या महाराष्ट्र दिन जरी असला तरी सुद्धा कोणालाही वाईट होईल असे वाटत नाही. मी बारसूमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सत्ता कोणाचीही असो, आपण त्यात सकारात्मक गोष्टीने बघायला हवं. या प्रकरणात शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. मी उपमुख्यमंत्री यांना विचारणार आहे की, स्थानिकांचे मत काय आहे? राज्यात बेरोजगारी आहे हे दूर करण्यासाठी राज्यात मोठे प्रकल्प आणले पाहिजे'.
'राज्यात प्रकल्प आणताना पर्यावरणाचा रास होणार नाही हे बघायला हवं. कोकणात फिरायला लोक जातात, राहायला जातात त्यांना त्रास होणार नाही हे बघायला हवं. अशा प्रकारचे प्रकल्प जगात कुठे आहेत हे बघायला हवं, जेणेकरून तेथील लोकांना काही आजार आले आहे का? या गोष्टी पाहता येतात, असे अजित पवार म्हणाले.
'उदय सामंत यांनी चर्चा केली त्यातून बऱ्यापैकी गोष्टी झाल्या आहेत. राजकीय दृष्ट्या हा प्रकल्प बघू नये. हा प्रकल्प येतो आहे, यात राजकारण आणू नये, विरोध करत असतील तर चर्चा करा, असेही अजित पवार म्हणाले.
शरद पवारांच्या 'लोक माझा सांगाती' या आत्मचरित्रावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'सर्वात आधी त्या पुस्तकाचं प्रकाशन होऊ द्या, मग जनतेला कळू द्या आणि नंतर मत मांडू'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.