सिमा दाते, प्रतिनिधी...
Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. पक्ष कोणाचा याबाबत वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेप्रमाणेच (Shivsena) राष्ट्रवादी कोणाची? हा वाद उभा राहिला आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा ठोकला जात असतानाच शरद पवार (Sharad Pawar) गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दाखल केले आहे.
या उत्तरात अजित पवार गटाने (Ajit Pawar) केलेले सगळे दावे फेटाळण्यात आले आहेत. तसेच सत्तेत सहभागी झालेल्या मंत्र्यांसह अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे.
अखेर स्पष्ट आकडा समोर...
दरम्यान, आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता अखेर समोर आला आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.